कातरवेळ
दिवस मावळतीला जातो...उन ओसरू लागतं...वातावरणात भयाण शांतता....कातरवेळ...आठवणींचे वादळ...एखाद्या वावटळीत पाला-पाचोळा उडून उंच आकाशात कुठेतरी आपलं अस्तित्व गमावून भरकटत जातो, तसं आपलं मन भरकटत जातं!
कानात घुमतो...तिच्या पैंजणांचा आवाज, तिचे मधुर सूर, तिचं निखळ हास्य..निरागस भाव.....तिच्या स्पर्शाची जाणीव होते..अंगावर काटा येतो...
आज माझ्याकडे सर्व काही आहे...पण त्यावेळी...
मी...एक परिस्थिती समोर झुकलेला... हतबल झालेला ... मनात भीती...माझ्यामुळे तिचे आयुष्य तर उध्वस्त नाही नं होणार?
तिचे निस्सीम प्रेम आणि निष्ठा सुद्धा मला आधार देऊ शकली नाही...का मीच तो आधार नाकारला?
एक निर्णय...बरोबर कि चूक कुणास ठाऊक?...पण त्या निर्णयामुळे...मी आज अपूर्णच राहिलो...
तिची सोबत मिळायला हवी होती....निरंतर !!!
No comments:
Post a Comment