कधी कधी खूप काही लिहावसं वाटतं!
पण नेमकी तुझी आठवण येते अन शब्दच हरवून जातात!
कधी कधी खूप ठरवतो...आता लिखाण बंद करावं म्हणून!
पण मग पुन्हा तुझीच आठवण येते आणि मग शब्द अवकाळी पावसातल्या गारांसारखे बरसू लागतात!
जेव्हा तुझ्या अंगणात गारा पडतील....दो-चार गारा तळहातावर घे...अन विरघळून जाईपर्यंत पाहत रहा....कदाचित तुलाही कुणाची तरी आठवण येयील!
No comments:
Post a Comment