राजे गेले...अन..
पाटीलकी बी गेली...
निजामाच्या जाचात
सगळी लुटालूट झाली..!
राझाकाराच्या गोळीबारात
म्हातारं बी गेलं...
७२ च्या दुष्काळात..
पचास जनावर मेलं...!
सिलिंगच्या कायद्यात
जमिनीला कुळ लागलं!
मुठभर पिकात तवा..
कसंबसं भागलं...!
९३ च्या भूकंपात
चीरबंदी वाडा बोकांडी घिऊन
म्हातारी बी जिरली...
येणाऱ्या-जाणार्या पावण्याला बसाया....
ढाळज तेवढी उरली..
आरक्षणाच्या तलवारीनं
लेकराच्या शिक्षणाचा गळा कापला...
मिरीटमदी यिऊनबी..
कुणी घेतला न्हाई दाखला...
आता धाकलं राखतंय म्हशी
अन थोरलं करतंय गुलामी(नौकरी)
डोळ्यादेखत सम्द्याच्या..
पाटीलकी लागली निलामी!
महेश
३/१०/२०११
No comments:
Post a Comment