Mann Maze

Mann Maze

व्यवहारी ज्ञान

फार पूर्वी ऐकलेली एक गोष्ट आठवली.

एक अतिविद्वान पंडित असतो. आपल्या बुद्धीचा त्याला खूप अभिमान/गर्व असतो. तो रोज गंगा नदी होडीने पार करून पल्याड आश्रमात जात असतो. एके दिवशी असाच होडीत बसला असता त्याला त्या नावाड्याची खिल्ली उडविण्याची लहर आली.
पंडित: काय रे, तुला श्लोक वगैरे पाठ आहेत का?
नावाडी: न्हाय बा!
पंडित: अरेरे, शतमुर्खा, तुला एकही श्लोक पाठ नाही? मला एकूण १६००० श्लोक मुखपाठ आहेत. शिवाय मी ५०० ग्रंथांचे पारायण केले आहे. ठीक आहे, तुला लिहिता वाचता तरी येते कि नाही?
नावाडी: न्हाय बा....
पंडित: अरेरे, नीच मनुष्या, तुला लिहिता वाचता सुद्धा येत नाही? तू जन्म घेऊन चूक केलीस! तुझ्यासारखी मूर्ख मानसं बुद्धीशिवाय कशी काय जगतात कुणास ठाऊक?
अरे, बुद्धिवान मनुष्य हा ताठ मानेने जगतो, जगात अशी कुठलीच गोष्ट नाही कि तो मिळवू शकत नाही.
नावाडी: पंडितजी, तुम्हाला पोहता येते का?
पंडित: नाही. का?
नावाडी: होडीला छिद्र पडले आहे, आणि पुढच्या १० मिनिटात होडी बुडेल. तुमची अगाध बुद्धी वापरा आणि जीव वाचवा!
पंडित नावाड्याच्या पाया पडू लागला...पण नावाडी काही न ऐकता नदीत उडी मारून पोहू लागला...
होडी बुडू लागली...पंडित जीवाच्या आकांताने नावाड्याला हाका मारू लागला...
मग नावाडी पोहत पोहत परत आला...आणि म्हणाला...
नावाडी: अरे शतमुर्खा, पहिली गोष्ट, त्या होडीला पकडून ठेव, तू बुडणार नाहीस....आणि दुसरी गोष्ट, या ठिकाणी पाण्याची खोली फक्त ४ फुट आहे.

तात्पर्य: पुस्तकी ज्ञान असो नसो, व्यवहारी ज्ञान असणे आवश्यक आहे.

No comments:

Post a Comment