
फणसावरून एक आलेला मजेशीर अनुभव आठवला...
मी आणि माझ्या मित्रांनी ऐन पावसाळ्यात बंदीपूर न्याशानल फोरेस्टला जाण्याचे ठरवले. पावसाळ्यात हे जंगल पर्यटकांसाठी बंद असते. पण तिथे असलेले फोरेस्ट ऑफिसर माझ्या मित्राच्या ओळखीचे होते, मग आम्ही परवानगी घेण्यासाठी गेलो तर ते म्हणाले मी पण तुमच्यासोबत येयीन. आणि त्यांनी फोरेस्ट गेस्ट हौस मध्ये राहण्याची व्यवस्था पण करण्याचे कबुल केले. मग निघण्याच्या दिवशी अचानक त्यांना कुठेतरी जावे लागले, आणि मग आम्ही मित्र मंडळी त्यांना सोडून गेलो. मग जंगलाच्या चेक पोस्ट नाक्यावरून त्यांना फोन लावला, आणि मग आम्हाला जंगलात जाण्यासाठी परवानगी मिळाली. जंगलात गेल्यावर मात्र मोबाईलला रेंज नव्हती. मग आम्ही गेस्ट हौस वर गेलो, तिथे त्या ऑफिसर ने आमची सोय केली नव्हती. मग तिथे असणाऱ्या चौकीदाराला/ कुकला ५०० रुपये देऊन आम्ही राहिलो. रात्री लाईट नव्हती. जंगलात कुणीच नव्हते. आम्ही ४ मित्र, मुसळधार पाउस आणि सोबत वाघ आणि इतर प्राणी. सकाळी फिरायला निघालो. पावसात मस्त फिरलो. पण जंगलात जागोजागी क्यामेरे लावले होते. लगेच एक सशस्त्र पथक आमच्या मागावर आले आणि आम्हाला पकडले. आमची कार सील केली. आम्ही त्यांना सर्व समजाऊन सांगितले पण ते ऐकेना...मग आम्हाला गेस्ट हौस वर नजर कैदेत ठेवण्यात आले. तिथला कुक गायब झाला...आम्ही उपाशी. मग आम्ही त्या सैनिकांना विनंती करुण तिथलिया आदिवासी लोकांकडे काही खाण्य्साठी मिलते का म्हणून बघायला गेलो. तर त्यांच्याकडे आम्ही खाऊ असे काही नव्हते, मग त्या आदिवासी माणसने आम्हाला हत्तीवर बसवले आणि आम्हाला जंगलात नेले, आणि मग त्या हत्तीने आम्हाला फक्त जे पिकले आहेत असेच फणस झाडावरून काढून दिले. चार दिवस फक्त फणस खाऊन जगलो. मग नंतर ते ऑफिसर आले. त्यांनी टायमावर जबान फिरवली. १५ हजार रुपये दंड ठोकला. मग कसेतरी २ हजारावर मानले.
(नंतर त्यांनी स्पष्टीकरण दिले, सर्वांची तोंडे बंद करण्यासाठी हे करावे लागते वगैरे वगैरे...)
तर सांगण्याचे तात्पर्य....नुसते फणस खाऊन ४ दिवस आम्ही चौघे जगलो.
No comments:
Post a Comment