कधी कधी होते...मनाची घुसमट!
मोहळातल्या माधमाश्यांप्रमाणे एकेक आठवणी बाहेर येतात, त्यातल्या काही कानात गोंगाट घालतात तर काही विखारी डंख मारतात!
मग चार भिंतींमध्ये, गडद अंधारात स्वत:ला कोंडून घेतो....सार्या जगाला विसरून जाण्यासाठी, त्या आठवणीना त्या अंधारात कायमचे गाडून टाकण्यासाठी!
पण होते उलटेच...जितका तो काळोख वाढत जातो, तितक्या त्या आठवणी जास्त बोचू लागतात! मनाची घुसमट वाढत जाते!
कुणाची असते हि आठवण? अन एवढी का येते हि आठवण?
कुणावर जीव लावल्यामुळे? कुणी आपल्याला धोका दिलेला असतो म्हणून?
कि आपल्या एखाद्या चुकीमुळे, सदैव आपल्या सोबत राहावीशी वाटणारी एखादी व्यक्ती आपल्यापासून दुरावल्यामुळे?
काय असते हि आठवण? आणि का आपल्याला तिचा एवढा त्रास होतो?
No comments:
Post a Comment