ढग दाटून आल्यावर
माझ्या मनात काहूर उठते
सुसाट वाऱ्या सम ते
सैरावैरा धावत सुटते
माझ्या वेदना पाहून
ते ढगही गरजतात
माझे सांत्वन करताना
माझ्याच डोळ्यांतून बरसतात
अतिवृष्टी झाल्याने
नदीला पूर येतो
पाला-पाचोळ्यागत...
मी दूर वाहून जातो...
आठवणी मुरतात खोलवर..
जरी पाउस हा क्षणांचा
कोण थांबवू शकेल आता
विध्वंस या मनाचा?
महेश.
No comments:
Post a Comment