डोळ्यांतील ते अगाध भाव, वाऱ्यापरी वाहतात का?
कधी कधी सुगंधापरी तुझ्या मनाला भिडतात का?
मनातल्या अथांग इच्छा, पावसापरी बरसतात का?
कधी कधी टपोर थेंब , तुझ्या गालावर ओघळतात का?
हृदयातील लुप्त भावना, इंद्रधनुपरी गंधाळतात का?
कधी कधी उधळून रंग,या चेहऱ्यावर खुलतात का?
विरलेल्या त्या नजरा, वळणावरी खिळतात का?
शुष्क डोळ्यांमध्ये सखे, आठवणी माझ्या दाटतात का?
महेश.
महेशा......
ReplyDeleteसळसळणारा वाराआजही जुन्या आठवणी दाटवितात का?
मस्त एकदम छान!!!!!