अजून आठवते ती वाट
जिथे आपण भेटायचो..
गर्द वडाच्या झाडाखाली
तासन-तास गप्पा मारायचो..
एकमेकांच्या डोळ्यांत
किती तरी वेळ हरवून जायचो..
तू चोरून आणलेला डब्बा
दोघे मिळून खायचो..
आठवतो तो पाउस..
दोघे चिंब भिजलेलो...
अन एकमेकांच्या मिठीत
न बोलता निजलेलो...
आजही ती वाट तशीच आहे..
अन आठवणीही तशाच आहेत..
तो वटवृक्ष मात्र...एका वादळात..
मुळासकट उन्मळून पडला आहे..
आणि त्याला बिलगलेल्या त्या वेलीने
आता दुसऱ्या वृक्षाचा आधार घेतला आहे!!
महेश!!
No comments:
Post a Comment