एका गावात गोपाल नावाचा मनुष्य राहत असतो. तो एक रोपटे लावतो. मग रोपटे हळू हळू मोठे होते, फांद्या फुटतात. बरेच उन्हाळे-पावसाळे सहन करत झाड उभे असते. मग अचानक झाडाला वाळवी लागते. वाळवी बुडातून वर वर चढत जाते, आणि एक एक फांदी पोखरू लागते. मग एक एक फांदी वाळायला लगते.गोपाल ला ती वाळवी दिसत नाही. मग तो वाळलेल्या फांदीला पाणी घालतो. पण फांदी काही हिरवी होत नाही. मग रागारागात तो ती फांदीच तोडून टाकतो. काही फांद्या आपोआपच त्या वाळवीमुळे सुकून गळून पडतात. पण गोपाळच्या लक्षात शेवटपर्यंत ते येत नाही. अशा रीतीने वाळवी एवढी पसरते कि शेवटी झाडच मोडकळीस येते.
तात्पर्य: केव्हाही कीड लागली कि त्याचे मूळ शोधावे, अन मुळासकट कीड नष्ट करावी.
© Copy Rights Reserved to the author!
Find the root cause ka???????
ReplyDelete