क्षितिजापलीकडे, नजर जाइल तिथपर्यंत किंवा त्याच्याही पलीकडे पसरलेल्या डोंगररांगा...त्यातल्याच डोळे बंद करून बोट ठेवून निवडलेल्या एका ओबड-दोबड डोंगराच्या माथ्यावर...सूर्यास्ताच्या वेळी...सौम्य आणि थंड वार्याच्या झुळुकी अंगावर झेलत...त्या मावळणाऱ्या, लालबुंद, एकाकी सूर्याकडे पाहत उभे असताना, मनात एकामागून एक, भूतकाळातील काही क्षणचित्रे येणं आणि मन कधी अस्वस्थ होणं तर कधी नकळत ओठांवर स्मित हास्य खुलून जाणं साहजिक आहे...त्याला आवडतं असं कधी कधी डोंगर माथ्यावर जावून किंवा समुद्र-किनार्यावर जावून एकांत अनुभवनं! या रहाटगाडगी व्यस्त जीवनात, आपल्या आयुष्यात कधीकाळी येउन गेलेल्या काही व्यक्ती पण काळाच्या ओघात पडद्याआड हरवून गेलेल्या...त्यांच्यासोबत घालवलेले ते क्षण पुन्हा आठवायला!
त्या आठवणीच्या गाठोड्यातील काही क्षण पुन्हा एकदा तेवढीच कळ काळजात उठवून जातात, काही मात्र पुन्हा ओठांवर हसू परत आणतात!
यावेळी मात्र तो एकटा नव्हता...त्याच्या "ती" होती, त्याची सर्वात आवडती व्यक्ती...तिच्यासोबत असताना एकांत वगैरे शब्द त्याला टोचतात, नकोसे वाटतात, पण ती सोबत नसताना मात्र एकांत काय असतो याची त्याला तीव्रतेने जाणीव होते, जीवाची एक वेगळीच घालमेल होते! दुर्दैव ते किती, दोघंही एकमेकांवर जीवापाड प्रेम करतात, एकमेकांसाठी सर्वस्व अर्पण करण्याची तयारी, पण केवळ सामाजिक बंधनांमुळे आयुष्यभरासाठी ते एकमेकांचे होऊ शकत नाहीत! पण त्यांच्या मनाची तयारी आहे, जे क्षण आपले आहेत ते तरी आपण सोन्याचे करूया, जगून घेऊया त्या मुठभर क्षणांत...जमेल तसे!
यावेळी या डोंगर माथ्यावर मात्र त्याला जाणवले, "आयुष्यात असे क्षण क्वचितच येतात, क्षणभराच्या भेटीतच आयुष्यभराचे होतात!"
कारण यावेळी तो एकटा नव्हता... आज त्याच्यासोबत "ती" होती! आणि आज पहिल्यांदाच त्याला जाणवले कि मावळणारा सूर्यही एकटा नसतो, त्याच्या सोबत एक रम्य सायंकाळ देखील त्याची सोबत करत असते!
(माझ्या "डोंगरमाथा" या अर्धवट राहिलेल्या गोष्टीतून...)
त्या आठवणीच्या गाठोड्यातील काही क्षण पुन्हा एकदा तेवढीच कळ काळजात उठवून जातात, काही मात्र पुन्हा ओठांवर हसू परत आणतात!
यावेळी मात्र तो एकटा नव्हता...त्याच्या "ती" होती, त्याची सर्वात आवडती व्यक्ती...तिच्यासोबत असताना एकांत वगैरे शब्द त्याला टोचतात, नकोसे वाटतात, पण ती सोबत नसताना मात्र एकांत काय असतो याची त्याला तीव्रतेने जाणीव होते, जीवाची एक वेगळीच घालमेल होते! दुर्दैव ते किती, दोघंही एकमेकांवर जीवापाड प्रेम करतात, एकमेकांसाठी सर्वस्व अर्पण करण्याची तयारी, पण केवळ सामाजिक बंधनांमुळे आयुष्यभरासाठी ते एकमेकांचे होऊ शकत नाहीत! पण त्यांच्या मनाची तयारी आहे, जे क्षण आपले आहेत ते तरी आपण सोन्याचे करूया, जगून घेऊया त्या मुठभर क्षणांत...जमेल तसे!
यावेळी या डोंगर माथ्यावर मात्र त्याला जाणवले, "आयुष्यात असे क्षण क्वचितच येतात, क्षणभराच्या भेटीतच आयुष्यभराचे होतात!"
कारण यावेळी तो एकटा नव्हता... आज त्याच्यासोबत "ती" होती! आणि आज पहिल्यांदाच त्याला जाणवले कि मावळणारा सूर्यही एकटा नसतो, त्याच्या सोबत एक रम्य सायंकाळ देखील त्याची सोबत करत असते!
(माझ्या "डोंगरमाथा" या अर्धवट राहिलेल्या गोष्टीतून...)
No comments:
Post a Comment