Mann Maze

Mann Maze

मै और तू...

तू नदी मै पवन
तू घटा मै सावन
तू बिजली मै बादल
तू दिया मै काजल

तू साहिल मै सागर...
तू धरती मै गगन
तू कश्ती मै लेहर
तू कली मै भवर

तू लब मै अल्फाज
तू कलम मै कागज
तू सूर मै आवाज
तू माजील मै आगाज

तू दर्द मै दवा
तू खुशबू मै हवा
तू खुशी मै आसू...
तू सपना मै वासू

मै धून तू बासुरी
मै हिरण तू कस्तुरी
मै पर्बत तू झील
मै मै राही तू मंजील

मै प्यास तू पाणी
मै चांद तू चांदणी
मै आकाश तू जमी
मै सुरज तू रोशनी
मै जिंदगी...तू जिंदगानी!
महेश.


रानफुल आणि मकरंद.

दिस मावळतीला गेला...
लाल आसमंत तो झाला...

दर्यावरचा तो पक्षीही...
आता परत आला..

सोनपिवळ्या किरणांनी..
तो परवत सोनेरी झाला..

अन सुसाट वाऱ्यात आता..
तो गारवा मिसळून गेला..

तिच्या श्वासांचा गंध दरवळला...
अन स्पर्श झाला ओला...

ती झाली एक रानफुल....
अन माही मकरंद झाला!

महेश.

पाहतो मागे वळून..

या रहाटगाडगी जीवनात..
खूप काही हवं होतं...
मनात जिद्द होती
अन मनगटात बळ होतं!

मागे वळून नं पाहता..
माझा रथ हाकीत राहिलो...
अडथळे उधळून टाकीत..
क्षिताजाकडे जात राहिलो...

जे जे हवे ते जिंकत होतो..
मनमुरादपणे अन उधळीत होतो..
असल्या कसल्या नशेत रमलो..
जगाला विसरून धुंदीत होतो...

जे पाहिजे ते मिळाले...
पण जिवाभावाचे मागेच राहिले...
आज मला मग मी...
एकटाच उरताना पहिले...

दुनियेच्या या गर्दीत..
आता कोण माझे उरले?
हरीण आता हे...
कळपातून भरकटले!

पाहतो मागे वळून..
पण रस्ता आता हरवला आहे...
माझ्या वाटणाऱ्या माणसांत...
आता मी परका आहे...!

खूप काही कमविण्याच्या नादात..
खूप काही गमवून बसलो..
माझ्याच लाचार जिंदगीवर..
आज माझा मीच हसलो!
महेश

दोन कप दुध...

पहाटच्या पारी देवीच्या देवळात काकड आरतीची घंटी वाजली. पडवीला बाजावर झोपलेलं म्हातारं खडबडून जागं झालं. हातरुनाच्या घड्या घालून, घोंगडं पांघरून, एका चरवीत पाणी घेऊन घराबाहीर आलं. थंडीनं गाव गारठून गेलेलं. दाट धुक्यातून रस्ता काढीत जनावराच्या गोठ्या पुढं येऊन जरा बसलं.आजू बाजूचा पालापाचुळा गोळा केला. फाटक्या सदऱ्याच्या खिशातून माचीस काढून शेकोटी पेटीवली. थोडं तापून झाल्यावर खिशातून एक बिडी काढून एक जळक्या काडी घेऊन बिडी शिलगावली. धुराचे धुरके सोडत देवीची काकड आरती ऐकत बसलं.

घरी एक दुभती म्हैस. म्हाताऱ्यानं पै पै जमा करून पाच वर्षापूर्वी हाळीच्या बाजारातून पहिल्या येताची म्हैस आणली होती . महिना भरा पूर्वी येलेली. एक रेडकू कपाळावर चंद्र घेऊन ऐन पौर्णिमेला जन्मलेलं. म्हैस दुधाची होती. रोज चरवीभरून दुध निघायचं.

शेजारच्या धोंडीबाचं कोंबडं बेंबीच्या देठातून कर्कस वरडलं . तांबडं फुटलं. म्हातारं बिगीनं उठलं. चरवी घेतली अन धार काढायला निघालं. मेकीला बांधलेलं रेडकू जीव तोडून दुध पिण्यासाठी वरडू लागलं. त्याचं खापाडीला गेलेलं पोट बघून म्हाताऱ्याला कसंतरीच झालं. म्हाताऱ्यान रेडकू सोडलं तसं रेडकू उड्या मारत म्हशीजवळगेलं अन म्हशीच्या कासात ढुसण्या हाणू लागलं. म्हसर रेडकाला चाटू लागलं. बघता बघता म्हशीनं पान्हा सोडला. म्हाताऱ्यान रेडकू आखडून मेकीला नेऊन बांधलं.

चरवीतल्या पाण्यानं म्हशीची कास धुतली. अन धारा काढायला बसलं. मेकीला बांधलेलं रेडकू पुन्हा वरडू लागलं. म्हातारं म्हशीची थानं धरून पिळू लागलं. पण रेडकाच्या आवाजानं म्हाताऱ्याचं काळीज दुखाया लागलं. चरवी भरत आली. मग न राहवून म्हाताऱ्यानं म्हशीच्या थानात थोडं दुध सोडलं अन रेडकाला दुध प्यायला मोकळं सोडलं. रेडकू चीटून दुध पिऊ लागलं. म्हातारं जरा वेळ तसच बघत राहिलं. त्याला त्या रेडकाला बघून त्याच्या पोराची लहान असतानाची आठवण आली. रेडकाचं भरलेलं पोट बघून मग काळीज थोडं हलकं झालं.

दुधाची चरवी घिऊन घरी गेलं. सुनबाई अजून उठली नव्हती. सैपाक घरात चरवी ठेवली.

अंघोळ आष्टी करून, धोतर पिळून वळणीवर वाळत टाकलं. काल धुतलेलं धोतर अन सदरा अंगावर चढवून पडवीला येऊन हरिपाठ म्हणत बसलं. तोवर सुनबाईने उठून घराची झाडाझुडी केली, दारात सडा टाकून रांगोळी घातली.

हरिपाठ म्हणून झाल्यावर म्हातारं चहाची वाट बघत बसलं. सूनबाईने दुधाची चरवी बघितली. दोन कप दुध कमी दिसत होतं. सुनबाईनं तिच्या धन्याला बोलावून घेतलं.

"तुम्हाला कितींदा सांगितलं, एखादा गडी ठिवा म्हैस राखायला म्हणून. पण माझं कोण ऐकतंय इथं?"

धन्यान लाडानं इचारलं,"काय झालं?"

"रोज दोन कप दुध कमी येतंय. मला वाटतंय म्हातारं धार काढून येता येता दुध पीतय." सुनबाई.

रेडकू वरडताना जेवढं दुखलं नव्हतं त्याच्यापेक्षा कितीतरी पटीनं भयानक कळ म्हाताऱ्याच्या काळजात उठली. गपचूप उठून घरा बाहीर पडलं अन देवीच्या देवळाकड चालायला लागलं!

तोंडात अजून हरिपाठाची गुणगुण सुरूच होती. "हरी मुखे म्हणा हरी मुखे म्हणा....पुण्याची गणना कोण करी...."

महेश.


तुझे माझे नाते....

तुझ्या जालीम नजरेला मी आता काचेच्या बाटलीत कोंडली आहे.....तुझ्या डोळ्यांत बुडण्याची लहर आली कि अलगद ढक्कन उघडतो आणि २-४ घोट तुझी नजर पिऊन घेतो...मग तुझ्या नजरेची नशा अशी काय चढते...वातावरण बदलून जाते, मन बेधुंद होते....हात सळसळतात...मग उचलतो लेखणी आणि उतरवतो काही शब्द कोऱ्या पानावर...कुणाला त्यात कविता दिसते...तर कुणाला गझल...पण त्यांना काय माहिती....त्या शब्दांत तू असतेस..आणि त्या शब्दातून जर तूच निघून गेलीस तर उरतो फक्त...एक कोरा कागद.
आपले नाते....कुणी म्हणते संपले..कुणी म्हणते ते नाते नव्हतेच...पण त्यांना काय माहिती....तू अजूनही माझ्याजवळच, माझ्या नसानसात, श्वासाश्वासात भिनली आहेस....आणि जेव्हा तूच निघून जाशील ....तर उरेल फक्त एक काचेची रिकामी बाटली....अन एक निर्जीव देह...!
महेश.

किती ऋतू येऊन गेले....पण....

मला आता तुझी बिलकुल आठवण येत नाही. शिशिरातल्या पानझडीत जसे एखाद्या वृक्षाचे पान पान गळून जाते तश्या तुझ्या आठवणी एक एक करून विरून जात आहेत.
अन पहाटेच्या धुक्यात जसे सर्व काही धूसर होऊन जाते तशी माझ्या डोळ्यांत साठलेली तुझी प्रतिमा सुद्धा असता धूसर होत चालली आहे.
आता वाट पाहतो आहे त्या ग्रीष्माची, रखरखत्या उन्हात उरल्या सुरल्या तुझ्या आठवणी करपून जाण्याची!
आणि वाट पाहतो आहे त्या वसंताची...आठवणींची झालेली राख वाहून जाण्याची!

असे म्हणत म्हणत किती ऋतू येऊन गेले....पण....

वाटतंय मलाही आता....

बोलतेस तू डोळ्यांत...
शब्द कुठे ते हरवले?

गुणगुणतेस तू ओठांत...
सूर कोणते ते गवसले?

नयनांच्या ह्या वादात..
मीच मला हरविले..

पौर्णिमेच्या रात्री त्या...
चांदणे कुणी ते भरवले?

तुझ्या नसण्याच्या कल्पनेने...
हृदयात धडकी का भरली....

काळजात अचानक माझ्या...
ही कळ अशी का उठली?

होती हृदयात जखम....
तुझ्या दिसण्याने विरली...

वाटतंय मलाही आता....
तुझीच प्रीत जडली...

एकटा ...

आज मी त्या हरणाला एकटा एकटा पहिले....
कळपाला डोळ्यांगत दूर जाताना पहिले....
तो कळापा पासून भरकटला....
कि कळपाने त्याला वाळीत टाकले?

कठीण समय येता..

माझ्या मनाची व्यथा...
इथे कोण ऐकतो?

चार भिंतीच्या मध्ये...
मी एकटा सापडतो...

भावनांच्या कुठल्या
वादळात मी अडकतो....

झिजलेल्या या हातांना..
आता कोण मदत करतो...

गरज सरली कि.
वैद्य येथे मरतो....

जो तो अपुल्या...
गुढ विश्वात रमतो..

कठीण समय येता..
कोण कामास येतो?

असंच!


भिंतीनाही मग पाझर फुटतो ...
एकांतात जेव्हा गातो मी गाणी...
माझेच प्रतिध्वनी मी ऐकतो ...
अन डोळ्यांत दाटते पाणी!

पाटीलकी

राजे गेले...अन..

पाटीलकी बी गेली...

निजामाच्या जाचात

सगळी लुटालूट झाली..!

राझाकाराच्या गोळीबारात

म्हातारं बी गेलं...

७२ च्या दुष्काळात..

पचास जनावर मेलं...!

सिलिंगच्या कायद्यात

जमिनीला कुळ लागलं!

मुठभर पिकात तवा..

कसंबसं भागलं...!

९३ च्या भूकंपात

चीरबंदी वाडा बोकांडी घिऊन

म्हातारी बी जिरली...

येणाऱ्या-जाणार्या पावण्याला बसाया....

ढाळज तेवढी उरली..

आरक्षणाच्या तलवारीनं

लेकराच्या शिक्षणाचा गळा कापला...

मिरीटमदी यिऊनबी..

कुणी घेतला न्हाई दाखला...

आता धाकलं राखतंय म्हशी

अन थोरलं करतंय गुलामी(नौकरी)

डोळ्यादेखत सम्द्याच्या..

पाटीलकी लागली निलामी!

महेश

३/१०/२०११

असंच!


आज पौर्णिमा आहे...घरी आलो अन लाईट गेली...मग गच्चीत जाऊन उभा राहिलो....समोरच्या इमारतींच्या जंगलामागून चंद्राचे लाल-तांबडे प्रतिबिंब हळू हळू वरती येऊ लागले....पूर्ण चंद्राकडे पाहण्यात रमून गेलो....संमोहित झालो...
त्या चंद्राच्या शीतल कायेत मी तुझे अस्तित्व शोधू लागलो....
किती वेळ मी तसाच उभा होतो कुणास ठाऊक?

असंच!


दिवस मावळतीला झुकतो....थंड वाऱ्याची झुळूक हलकेच स्पर्शून जाते....
पक्षी घरट्याकडे परतू लागतात....अशा कातरवेळी, मनात अनामिक काहूर उठते...मन माझ्याही नकळत कुणासाठी झुरत आहे हे माझ्यासुद्धा लक्षात येत नाही!
रोज कातरवेळी मन कुणाची तरी वाट पाहत रहातं....स्वप्न रंगवत रहातं...
एकटे चालताना ती सोबत असल्याचे, माझ्याशी बोलत असल्याचे भास होतात...
तिचे निरागस हास्य आठवून माझेही ओठ आपसूक, माझ्याही नकळत हसून जातात!
वाऱ्याच्या थंड झुळकीबरोबर, समुद्राच्या लाटांबरोबर, पावसाच्या थेंबांबरोबर तिचे ते हळवे आणि नाजूक स्पर्श आठवतात अन अंगावर रोमांच उभे राहतात!
यालाच प्रेम म्हणतात का हो?
याचे उत्तर हो असेल तर.......

आबाळ..


उपाशी कुत्र्याने....
का हाळजावी पिलावळ.....
पोट भरता भरता....
तान्ह्या जीवाची तारांबळ...


नाही रहाया छपर....
नाही खायला भाकर...
का देवाच्या माथी उगा...
मग फोडतो खापर?


असल रक्तात रिग...
कर लेकरांचा सांभाळ.....
लेकरा संग मायीची
अगा कशाला आबाळ?


तुझ्या जुलमी हवसीची....
साऱ्या संसाराला झळ...
जखमा उरात...
लेकरांच्या जलमभर!

ऐसेही!


अब और न रोको इस दिवाने को...
सुबह बोझल आंखे देख लोगो को गलत फेह्मी न हो जाये!

ऐसेही!


अब सपनो मे भी वो बात नही रही...
उनका हकीकत मे बदलना अब मुमकीन न रहा!

ऐसेही!


बस अब सोये हुए दिल को मत जगाओ यारोँ....
देर रात कही तूफ़ान न आ जाये!

ऐसेही!


रातें ही रेगिस्तान की तरह वीरान हो गयी.....यारोँ
अब तो सपने भी रेत की तरह बिखर गये!

असंच!

वाटतं कधी कधी...
गारा होऊन तुझ्या अंगणात बरसून जावं!
तुझ्या नाजूक तळहातानी...
मला अलगद झेलून घ्यावं!
तुझ्या ओठांवर विरघळून मग....
माझं आयुष्य संपून जावं!
महेश.

असंच!


कधी कधी खूप काही लिहावसं वाटतं!
पण नेमकी तुझी आठवण येते अन शब्दच हरवून जातात!
कधी कधी खूप ठरवतो...आता लिखाण बंद करावं म्हणून!
पण मग पुन्हा तुझीच आठवण येते आणि मग शब्द अवकाळी पावसातल्या गारांसारखे बरसू लागतात!
जेव्हा तुझ्या अंगणात गारा पडतील....दो-चार गारा तळहातावर घे...अन विरघळून जाईपर्यंत पाहत रहा....कदाचित तुलाही कुणाची तरी आठवण येयील!

असंच!


ऐन मोसमात जसे...
नदीला उधाण यावे...
अन सागराच्या मिठीतच 
तिने शांत व्हावे...


असे घडावे अवचित काही...
तुला माझ्या मनीचे गुज कळावे...
ऐन विरहाच्या रात्री...
तू मला येऊन बिलगावे!

असंच!


पौर्णिमेच्या मध्यरात्री...
पाण्यात चंद्रबिंब पाहतो....
तुझ्या आठवणीत हा वेडा,...
रात्रभर चांदण्यात नाहतो!

पुन्हा एक...कविता लिहितो मी!


पौर्णिमेच्या रात्री जेव्हा....
सागरास भरती येते 
धुंद लाटांसोबत....
एकटाच बोलत बसतो मी....


सूर्य मावळतीला झुकतो...
अन पाखरे घरट्यात निजतात....
रात्रीच्या भयाण अंधारात...
मलाच मग शोधतो मी...


सुसाट वारा सुटतो...
अन ढगही गर्जना करतात...
त्या अवकाळी पावसात...
मनसोक्त मग भिजतो मी...


शिशिराच्या दाट धुक्यात...
तुझी वाट पाहतो मी...
अन तुझ्या पुसट पाठमोऱ्या प्रतिमेवर...
पुन्हा एक...कविता लिहितो मी!


महेश.